मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत काही ना काही अघटित असे घडत आहे. कुठे फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकरी मरतो आहे.... तर कोणी रेल्वे पुलाच्या चेंगरचेंगरी खाली जातोय.... अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे कोणी ख्यातनाम डॉक्टर ड्रेनेज मध्ये अडकून मरतोय ....कधी मंजुळा शेट्ये तर कधी अनिकेत कोथळे सरकारी अनास्थेचे बळी ठरतात ..इमारत कोसळून अनेक जीव दबले जातात ...नुकतेच झालेले अग्नी तांडव कमला मिल व भानु फरसाण अशा अनेक घटना काही लगतच्या दिवसांमध्ये सातत्याने घडतांना दिसत आहे.
हे सर्व घटना घडत आहे पण आपली प्रशासन व्यवस्था मात्र अजूनही निद्रिस्त अवस्थेत आहे. या जगात कोणीही किरकोळ नसतो. प्रत्येक जण हा व्यैयक्तिक आयुष्यात कोणासाठी तरी एक आधार असतोच किंवा महत्वाचा असतो. एक गेला/दोन-चार गेलेत तर आपण ह्या घटना किरकोळ समजतो. किरकोळ संख्या असली म्हणजे इतना तो चलता है... ये तो होता है.... याप्रकारे काना डोळा करून विषय संपवला जातो . ही वृत्ती सोडून व्यवस्थेने याचे गांभीर्य ओळखले पाहिजे.
“रोज मरे त्याला कोण रडे’ अशी सरकारी यंत्रनेची स्थिती झाली आहे. मग कालचे ८४ वर्षीय धर्मा पाटील हे सुद्धा याच सरकारी अनास्थेचे बळी ठरले आहेत. सर्वसामान्य माणूस असाही दररोज धडपडत जीवन जगतच आहे, त्यांची दुःखे,गरीबी,बेकारी दूर करणे सोडून सरकार सर्वसामांन्याची गरीबी, बेकारी ही त्यांना संपवून तर हटवत नाही ना याच उत्तर आता शोधावे लागेल...?
अमित येवले.
बी.ई.(इलेक्ट्रिकल)
एम.ए.(लोकप्रशासन)
No comments:
Post a Comment