बाबा आमटेंना ओळखत नाही असा सार्वजनिक जीवनातील व्यक्ती दुर्मिळच असेल. त्यांनी मुख्यतः कुष्ठरुग्णांसाठी उभारलेले आनंदवन, अशोकवन, सोमनाथ प्रकल्प; माड़िया गोंड या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील भागातील आदिवासींसाठी 'हेमलकसा' येथे उभारलेला लोकबिरादरी प्रकल्प हे त्यांनी उभे केलेले संस्थात्मक काम आपण सगळे बऱ्यापैकी जाणून आहोत. बाबांचा ‘भारत-जोडो यात्रा’ आणि ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ यांच्यामधील सहभाग गांधींच्या 'रचनात्मक संघर्ष' या विचाराचे अनुकरण होता. बाबा कवी म्हणून प्रचंड प्रतिभाशाली होते. 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम', 'माती जागवील त्याला मत' हे बाबांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ज्वाला आणि फुले बद्दल तर असे म्हटले जाते की त्याचा इंग्रजी अनुवाद जर त्या वेळी आला असता तर त्या वर्षीचे नोबेल पारितोषिक बाबा आमटेंना मिळाले असते. बाबांनी 'उज्वल उद्यासाठी' हे तरुणांसाठी मार्गदर्शनपर पुस्तक लिहिले आहे आणि 'सार्वजनिक संस्थांचे संचालन' हे छोटे पुस्तक संस्था कशा चालवाव्यात यावर लिहिले आहे. बाबा आपल्या ९३ वर्षांच्या आयुष्यात इतक्या आव्हनांना सामोरे गेले आणि प्रचंड असे मोठे काम उभे केले की त्यांच्या हयातीतच ते एक आख्यायिका बनले होते. या लेखात आपण आनंदवन स्थापन करण्यापूर्वी बाबांनी काय काय प्रयोग केले ते जाणून घेऊयात.
नागपुरातील धरमपेठ या उच्चभ्रू भागातील मालगुजार कुटुंबात जन्मलेले बाबा आनंदवनापूर्वी पण फार विलक्षण आयुष्य जगले. एकाच आयुष्यात त्यांना अनेक आयुष्ये जगायची जिद्द होती आणि एकामागुन एक काम उभे करत त्यांनी ती पूर्ण केली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच एक गितात ते म्हणतातच की ''फिरुनी मी तयार सर्व टाकुनी पसारा'' नविन कामांना नविन आव्हानांना नेहमी ते तयार असत.२६ डिसेंबर १९१४ रोजी जन्मलेल्या मुरलीधर देवीदास आमटे यांच्यावर त्यांची आई लक्ष्मीबाई यांचा खुप प्रभाव पडला. बाबा आमटे यांच्यात असणारी आक्रमक करुणा त्यांना त्यांच्या आईकडूनच वारसा हक्काने मिळाली आहे. बाबा तरुण असतानाचा काळ स्वातंत्र्य आंदोलनाचा होता. सुरुवातीला बाबा क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. बाबा पैलवान होते, व्यायामाने कमावलेले शरीर काहीतरी आव्हानात्मक करण्यास असुसले होते. बाबांना या काळात 'छोटा बजरंग' म्हणूनच ओळखले जाई. या व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातुनच हुतात्मा राजगुरु यांच्याशी त्यांचा संपर्क आला व मैत्रीही झाली. सॉण्डर्सचा खून केल्यानंतर राजगुरु हे भूमिगत असताना एकदा बाबांच्या घरी नागपुरला राहिले होते.
नागपुरातील धरमपेठ या उच्चभ्रू भागातील मालगुजार कुटुंबात जन्मलेले बाबा आनंदवनापूर्वी पण फार विलक्षण आयुष्य जगले. एकाच आयुष्यात त्यांना अनेक आयुष्ये जगायची जिद्द होती आणि एकामागुन एक काम उभे करत त्यांनी ती पूर्ण केली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच एक गितात ते म्हणतातच की ''फिरुनी मी तयार सर्व टाकुनी पसारा'' नविन कामांना नविन आव्हानांना नेहमी ते तयार असत.२६ डिसेंबर १९१४ रोजी जन्मलेल्या मुरलीधर देवीदास आमटे यांच्यावर त्यांची आई लक्ष्मीबाई यांचा खुप प्रभाव पडला. बाबा आमटे यांच्यात असणारी आक्रमक करुणा त्यांना त्यांच्या आईकडूनच वारसा हक्काने मिळाली आहे. बाबा तरुण असतानाचा काळ स्वातंत्र्य आंदोलनाचा होता. सुरुवातीला बाबा क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. बाबा पैलवान होते, व्यायामाने कमावलेले शरीर काहीतरी आव्हानात्मक करण्यास असुसले होते. बाबांना या काळात 'छोटा बजरंग' म्हणूनच ओळखले जाई. या व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातुनच हुतात्मा राजगुरु यांच्याशी त्यांचा संपर्क आला व मैत्रीही झाली. सॉण्डर्सचा खून केल्यानंतर राजगुरु हे भूमिगत असताना एकदा बाबांच्या घरी नागपुरला राहिले होते.
No comments:
Post a Comment