![]() |
स्पर्धा परिक्षेतील भावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना राजीव तांबे. |
पुणे प्रतिनिधी:- "सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते. नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा",असे मोलाचे मार्गदर्शन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजीव तांबे यांनी केले.
'एमपीएससी-मित्र' ह्या नितीन प्रकाशन व पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या क्रायक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एमपीएससी परिक्षेमध्ये यशस्वी वाटचाल करणाऱ्या प्रथमेश घोलप आणि विवेक धांडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
![]() |
विवेक धांडे यावेळी मार्गदर्शन करतांना |
No comments:
Post a Comment