या महान पुरुषाने सुप्त अवस्थेत असल्याला समाजाला नवी ऊर्जा , दिशा,साहस देण्याचे काम केले. त्यांच्या ओजस्वी वाणीने भारतात व भारताबाहेर अनेक लोकांना मोहित केले. कोणत्याही देशाची खरी ताकद ही त्यांच्या देशाचे युवक असतात, हे त्यांनी नेहमी पटवून दिले. त्यांच्या विचारांनी युवाशक्ती ही नेहमी बोध घेत राहिली.
अमेरिकेत `भगिनींनो आणि बंधूंनो’ या शब्दांनी सार्या मानवजातीला साद घलणारे स्वामी विवेकानंद एकमेव वक्ते होते. त्यांनी त्यावेळी सांगितलेले विचार हे आज सुद्धा तेवढेच काल सुसंगत वाटतात. आयुष्यभर सकारात्मक विचारांची पेरणी केलेल्या या महापुरुषाला विनम्र अभिवादन..!
-------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment