Thursday, 23 November 2017

श्रीपाद जोशी लिखित 'हवी तशी नक्षी' पुस्तक प्रकाशन....

श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला


पुणे प्रतिनिधी - ' हे पुस्तक वाचतांना मी स्वतः नापास झालोस, फार गुंतागुंतीचे असे महाकाव्य स्वरूपाचे लेखन करण्यात आले आहे. अनुभूति व अभिव्यक्ती यांची सांगड घालणारे हे लेखन जीवनातील अनेक प्रश्न सोडविन्यास मदत ठरू शकते . जोशी हे सामान्य व्यक्ती आहेत पण त्यांची सामाजिक तळमळ, ऊर्मी ही असामान्यतेला शोभणारी आहे.' असे ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा व दिलीपराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने
श्रीपाद भालचंद्र जोशी लिखित 'हवी तशी नक्षी' पुस्तक प्रकाशन सोहळा ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. अश्विनी घोंगडे या उपस्थित होत्या.

 या प्रसंगी अश्विनी धोंगडे म्हणाल्या, 'हे पुस्तक वाचल्यानंतर विचार करण्याला लावेल असेच आहे. ललीतबंधच्या ऐवजी हे पुस्तक 'नाट्यमय स्वगत' अशा स्वरूपात मोडेल असे आहे. या संपूर्ण पुस्तकात एकोणवीस स्वगत आहेत. नक्षी ही एक कला आहे त्यामुळे खरंच मनाला हवी तशी विचारांची नक्षी या मध्ये मांडली आहे.

श्रीपाद जोशी या प्रसंगी म्हणाले, 'आज समाजात कोणी शीर मागतोय तर कोणी गळा मागतोय. पण हे सोडून समाजात बुद्धि वा मेंदू मागण्याची हिम्मत कोणी करत नाही. ही सध्याची शोकांतिका आहे.३० वर्षांपासून माध्यमांनी केलेली लोकांच्या केलेल्या बुद्धिबेदाची प्रेरणा या पुस्तकाच्या मागे आहे. विचारातून विचार आणि  प्रश्नांतुन प्रश्न जोपर्यंत निर्माण होत नाही, तो पर्यंत आयुष्य सुंदर होऊ शकत नाही. मी याच प्रश्नांचा शोध या माझ्या लेखनातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.'

 या प्रसंगी दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे ,उद्धव कानडे, सचिन इटकर , संतोष शेणई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले तर सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

No comments:

Post a Comment