'' जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ असणे आवश्यक असते '' असे एका तत्ववेत्याने फार पूर्वी म्हंटले होते . आज एका बलाढ्य वैचारिक सामर्थ्याची खरोखरच गरज भासत आहे, कारण जे विचार करताहेत त्यांच्या मात्र हत्या केल्या जात आहे.
एकीकडे न्यायालय अनेक प्रकारचे स्वातंत्र्य देत आहे, पण वैचारिक भूमिका मांडण्याच्या स्वातंत्र्यास मात्र समाजकंटक विरोध दर्शवित आहे. तेवढी आपण नावापुरती लोकशाहीची मूल्ये स्वीकारली , पण आचरणात आणली नाहीत . सध्याच्या आभासी जगातून बाहेर येण्यासाठी जगण्याला वास्तवतेची जोड द्यावी लागणार आहे.
आज समाजात वैचारिक विषमता फार टोकाला भिडलेली दिसत आहे.विचारवंतांच्या दुष्काळ व अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचे खरे दुर्दैव झाले आहे . आज या देशात कोणाला ऑक्सिजन मिळत नाही म्हणून जीव सोडावा लागत आहे , तर काहीजण पशूला वाचवण्यासाठी जिवंत माणसांची हत्या करीत आहे.
११ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी '' विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले .... '' असे म्हंटले होते. या ज्ञानेश्वरांना समाजाने तितकाच त्रास दिला . सत्वशील विचारांची गंगा समाजापर्यंत पोहचवत मूढांना सुज्ञ करण्याचा जगतगुरु तुकारामांना समाजाकडून हाच त्रास झाला होता. आपण कोण आहोत ? कशासाठी आलोय ? आणि आयुष्याला आपण काय परत देणार ? या प्रश्नांचा एकदा सारासार विचार केल्यास मानवी जीवन पोहचेल. यासाठी सर्वांच्या विचारांच्या सीमोल्लंघन व्हावे, हीच अपेक्षा करूयात .
-टीम वृत्तवेध
No comments:
Post a Comment